Friday, 25 October 2013

सोशल मिडीयाचा प्रभावी अस्वाद


आताच्या सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव पाहता त्याने मानवी मनोवृत्तीवर फार परिणाम केला आहे. यामुळे नात्यानात्यांत दरी निर्माण होत असून सार्वजनिक क्षेत्रात वावरत असताना गरीब-श्रीमंत, उच्च-निच, अनुरूप–कुरूप या सर्व गोष्टी खुपच परिणाम करत आहेत. काही मुले–मुली सहली दरम्यान बाहेर निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तेथे जाऊन काढलेले फोटो सोशल साईट्सवर अपलोड करतात. परंतू कधीकधी अशा ठिकाणांचे चित्रण सोशलसाईट्सवर जाहिररित्या केल्याने कदाचित संबंधीत व्यक्तीच्या भावना दुखावण्याची शक्यता असते.  यांना बाहेर जाण्यासाठी कशी परवानगी मिळते, मग आपल्याला का नाही मिळत यासारखा गोष्टींमुळे खरे बोलणारा व्यक्ती देखील घरच्यांशी खोटे बोलून बाहेर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन चिञकरण करतात. एवढेच नव्हे तर कोणी गाडी जरी घेतली तरी त्याचे फोटोस टाकतात, पण एखादा मुलगा अथवा मुलगी गरीब असते, ते पाहुन त्यांनाही असे वाटते की, आपल्याकडे गाडी का नाही...?
फेसबूकवर मजामस्तीम्हणून एखादा मुलगा मुलीच्या नावाने संवाद साधतो तर एखादी मुलगी मुलाच्या नावाने संवाद साधते पण या गोष्टी फार धोकादायक बनतात. खोटे का असेना पण त्यांचे मन त्यातच लागते या गोष्टींमुळे एकतर्फी प्रेम वैगरे सारख्या गोष्टी नेहमीच आपल्या कानावर ऐकु येत असतात. आज कालची मुले सुंदर मुली पाहुन त्यांच्याशी संवाद साधतात पण ज्यामुली सर्वसाधारण आहेत त्यांच्याशी कोणीतरी बोलावे त्या प्रयत्न करत असतात. अशाच गोष्टींमुळे हल्ली खोटे प्रकार देखील फार वाढत आहेत.
यीचीच परिणाम म्हणजे लहान वयातच मुल-मुली ब्लॅकमेलींग शिकतात आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी ब्लॅकमेलींग करत असतात. आज हे सोशल नेटवर्कींग एवढे पसरले आहे की, याचा प्रसार रोखणे खठिण दिसते. याला तुम्ही-आम्ही कोणीच थांबवू शकत नाही.
  







No comments:

Post a Comment